मा.उषाकिरण आत्राम यांच्या काव्यसंग्रहातील "आई मारु नकोस गर्भात "ही कविता नागपूर विद्यापीठाच्या बी.ए.प्रथम वर्षांकरिता
नागपूर: लेखणीच्या तलवारी" या मा.उषाकिरण आत्राम काव्यसंग्रहातील "आई मारु नकोस गर्भात "ही कविता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.ए.प्रथम वर्षांकरिता आवश्यक मराठी या विषयासाठी निवड करण्यात आली आहे.
आदिवासी समाजातील गोंडवणातील पवित्र भूमी कचार गड, जिल्हा गोंदिया येथील प्रतिभावंत ज्येष्ठ लेखिका उषाकिरण आत्राम यांची विपुल साहित्य संपदा आहेत, विविध सामाजिक, आदिवासी व इतर विषयावर लेखन, कविता त्यांच्या नावे आहेत. शालेय अभ्यास क्रमात सुध्धा त्यांच्या कवितेचा समावेश आहे.
नुकतेच मराठी भाषा अभ्यास मंडळ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सभेत त्यांच्या लेखणीच्या तलवारी या कविता संग्रह मधून "आई मारू नको गर्भात" या स्त्री भ्रूण हत्येचे वास्तव मांडणारी कविता विद्यापीठाच्या बी. ए.प्रथम वर्षाच्या आवश्यक मराठी साठी समाविष्ट केली गेली आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. आदिवासी लेखक, साहित्य कार यांच्या प्रगल्भता यामुळे सन्मान मिळाला,
जेष्ठ लेखिका मा.उषाकिरण आत्राम यांचे अभिनंदन मा. दिनेश शेराम, सिनेट, व्यवस्थापन परिषद सदस्य, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ. यांनी केले.