धुळे: एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याने भाजपच्या खान्देशातील परिणाम होईल असे राजकीय जाणकारांचे मत आहे,मात्र भाजप नेत्यांनी हा दावा खोडून टाकीत ते पक्ष सोडून गेले तरी कोणताही फरक पडणार नाही असा विश्वास व्यक्त केला आहे.याचीच पहिली परिक्षा आता खान्देशातील धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत दिसून येणार आहेत.या निवडणूकांच्या निकालानंतर खान्देशात राजकीय वातावरणाचा कल दिसून येईल मात्र पक्षांतरानंतर भाजपच्या ताकदीची कसोटी आणि अमरिशभाई पटेल याच्या राजकीय अस्तित्वाचा शोधही असेल.
हेही पाहा: धुळे आणि नंदुरबार विधान परिषदेची पोटनिवडणुकीसाठी डिसेंबर रोजी मतदान! काय आहे गणिताचा आकडा?
राज्यात शिवसेना, काँग्रेस, व राष्ट्रवादी "महाविकास आघाडी" स्थापना करण्यात आली. त्यांनी राज्यात सत्ता स्थापन केली आज त्याला एक वर्षे पूर्ण होत आहे. ही आघाडी सत्तेवर आल्यानंतर विधानपरिषदेच्या निवडणूकीच्या माध्यमातून प्रथमच जनतेच्या दरबारात कौल आजमावित आहेत.त्यामुळे राज्यातील शिक्षण, पदवीधर तसेच स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या निवडणूकीकडे संपूर्ण लक्ष आहे मात्र त्यात खान्देशातील धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या निवडणूकीकडे विशेष लक्ष असणार आहे. कारण भाजपचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर प्रथमच हि निवडणूक होत आहे.त्यामुळे खडसेंच्या पक्षांतरांचा किती परिणाम होईल हेही या निवडणुकीत दिसून येणार आहे.
हेही आवर्जून पाहा: उद्या विधान परिषद निवडणुकीसाठी दहा केंद्रांवर होणार मतदान |